(Socialism)समाजवाद संपणार नाही : डॉ अभिजित वैद्य
‘लोकनेते भाई वैद्य कृतज्ञता पुरस्कार एड . संतोष म्हस्के यांना प्रदान
सजग नागरिक टाइम्स : पुणे :’जग हे भांडवलशाही आणि उजवीकडे घरंगळत आहे ,(Socialism) समाजवाद संपत चालला आहे ,असे बोलले जात आहे .
मात्र , जोपर्यंत समाजात विषमता आणि असमानता आहे तोपर्यंत समाजवाद संपणार नाही,’ असे ठाम प्रतिपादन आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ . अभिजित वैद्य यांनी केले .
‘ज्ञान फाउंडेशन ‘आयोजित ‘लोकनेते भाई वैद्य कृतज्ञता पुरस्कार’
सामाजिक कार्यकर्ते एड . संतोष म्हस्के यांना डॉ अभिजित वैद्य आणि ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
त्यावेळी डॉ . अभिजित वैद्य बोलत होते .ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि नेते भाई वैद्य यांच्या ९१ व्या जन्मदिनानिमित्त पूर्व संध्येला हा पुरस्कार सोहळा झाला .
शुक्रवार २१ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम साहित्य परिषद येथे झाला .डॉ . अभिजित वैद्य म्हणाले ,’भाई वैद्य हे एक विद्यापीठ होते .
ते कार्यकर्त्यांवर वैचारिक छत्र धरीत आणि लढ्याची तलवार हाती देत असत . एड . संतोष म्हस्के यांनी भाईंच्या विचाराचा गाभा पकडून कष्टकऱ्यांसाठी कार्य केले .
भाई गेले पण ‘ मरावे परी कार्यकर्त्यांरूपी उरावे ‘ही नवी उक्ती सिद्ध झाली आहे . सध्या आपण बिकट कालखंडातून जात आहोत .
‘जागतिकीकरणानंतर आर्थिक विषमता वाढेल आणि ती सामाजिक विषमतेला वाढवेल ‘ हा भाईंनी दिलेला इशारा खरा ठरला आहे .
जग भांडवलशाही आणि उजवीकडे घरंगळत आहे ,(Socialism) समाजवाद संपत चालला आहे ,असे बोलले जात आहे .
मात्र , जोपर्यंत समाजात विषमता आणि असमानता आहे तोपर्यंत समाजवाद संपणार नाही .
सामाजिक ,आर्थिक आघाडीवरील लढाया समाजवादी कार्यकर्ते लढत आणि जिंकत आले .
मात्र ,राजकीय परिवर्तनाची लढाई जिंकणेही भाई वैद्य यांना अभिप्रेत होते .
त्यासाठी भक्कमपणे ,निर्धाराने आणि उपेक्षा वाट्याला आली ,तर ती सहन करीत पुढे गेले पाहिजे . ‘
मल्हार अरणकल्ले म्हणाले ,’भाईंचा प्रवास हा सत्याच्या आग्रहाचा ,ध्यासाचा प्रवास होता .त्यांचे विचार पारदर्शी होते .
श्रोत्यांना विषय उलगडून सांगणे ही त्यांची खासियत होती . व्रतस्थ जीवन जगायचे ठरवून भाईंनी निरनिराळ्या क्षेत्रात काम उभे केले .
भाई वैद्य हे निर्मळ मनाचे ,निर्मळ कामे करणारे निरलस माणूस होते .त्यांनी समाजवादी विचारांचे निर्मळ झरे निर्माण केले . हे झरेच दूषित प्रवाहांना शुद्ध करतील .
‘सत्काराला उत्तर देताना एड . संतोष म्हस्के म्हणाले ,’भाई वैद्य आणि जयवंत मठकर यांनी जीवनाला दिशा दिली .
हे झरेच दूषित प्रवाहांना शुद्ध करतील .’सत्काराला उत्तर देताना एड . संतोष म्हस्के म्हणाले ,’भाई वैद्य आणि जयवंत मठकर यांनी जीवनाला दिशा दिली .
भाईंच्या विचारांचे अनेक पाईक आहेत ,त्यांचा प्रतिनिधी म्हणून हा कृतज्ञता पुरस्कार स्वीकारत आहे.
हा पुरस्कार म्हणजे भाईंचे विचार पुढे नेण्याचा कार्यक्रम आहे .
भाईंच्या विचाराचा गौरव आहे . सातत्य ठेवले तर कष्टकऱ्यांच्या लढाईत यश मिळते ,हा मंत्र भाईंनी कार्यकर्त्यांना दिला . ‘
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . मनोहर कोलते . अर्चना मुंद्रा ,सचिन शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते .