ताज्या घडामोडी

स्कुल व्हॅनला आग ;सुदैवाने व्हॅनमधील सहा विद्यार्थी सुरक्षित

Advertisement

पुणे : प्रतिनिधी :  टिळक रोड, न्यू इंग्लिश स्कुलच्या पटांगणात स्कुल व्हॅनला आग लागली ; सुदैवाने व्हॅनमधील सहा विद्यार्थी बाहेर असल्याने सुरक्षित  होते सदरील प्रकरणा बाबत अग्निशमनदलला कळवण्यात आल्यानंतर अग्निशमनदल तत्परतेने आले व अग्निशमनदलाच्या जवानांनी कारला लागलेली आग झटपट विजविली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आपण आपल्या  मुलांची घरी खूप काळजी घेतो पण शाळेत सोडताना निष्काळजीपणा करतो कि ज्या बस ,कार,रिक्षात, मुले शाळेत जात आहे त्यात तो निवान्त पणे बसू शकतो का ? त्याचा जीव गाडीत गुदमरत तर नाहीना ? रिक्षाचालक,कारचालक जनावरानप्रमाणे तर मुले गाडीत भरत नाहीना याची काळजी घेतो का ? कि स्कूल ब्याग प्रमाणे  ओझ्या सारखे मुलांना कोठेहि  फेकून देतो?   मुलांची काळजी घेणे हि पालकांची जबाबदारी नाही का ?अशे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत . पुणे परिवहन विभागाकडून स्कूलबस चालविण्यासाठी कठोर नियम असतानाही शहरात अनेक स्कूलबस,स्कूल वैन बिनदिक्कतपणे नियम तोडून  विद्यार्थ्यांना ने-आण करीत आहेत.

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता

Advertisement

नियमांना धाब्यावर बसवून राजरोसपणे चालविण्यात येणाऱ्या या स्कूलबसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकहीत फाउंडेशनकडून करण्यात आली होती.आरटीओ नियमानुसार रिक्षामध्ये तीन आणि मारुती व्हॅनमध्ये सातपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करता येत नाही. मात्र सध्या रिक्षात ८ ते १२ विध्यार्थी ,तर कार मध्ये  १० ते १६ विध्यार्थी  कोंबून या दोन्ही वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक केली जात आहे. एकाच वाहनात जास्त प्रमाणात मुले भरल्यामुळे त्यांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.  अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजहर खान यांनी दिली.याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाला यापूर्वी  निवेदन देण्यात आले होते .

या लिंकवर क्लिक करून पहा .619 रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस.

स्कूलबसच्या अवैध वाहतुकीकडे आरटीओ आणि वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पावती फाडून टार्गेट पूर्ण करणाऱ्या वाहतूक पोलिसांना हे सर्व प्रकार कसे काय दिसत नाही? आज मुलांचे नशीब जोरात असल्याने त्यांना काहीही झाले नाही ,जर विद्यार्थी कारमध्ये असते तर केवढे मोठे अनर्थ झाले असते याबद्दल विचार न केलेले बरे असा प्रश्न फाउंडेशनने उपस्थित केला आहे.दरम्यान, याबाबत दोषी स्कूलबस चालकांवर कारवाई करण्यात यावी असे खान यांनी सांगितले.

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा 

Share Now

Leave a Reply